महाभारताच्या भीषण युद्धाच्या अंतानंतर अश्वत्थामा मृत्यूच्या पूर्णविरामापर्यंत भटकंतीला निघतो...ती भटकंती आजही चालूच आहे म्हणतात.
आशुतोष गर्ग यांच्या "अश्वत्थामा" या १६८ पानी पुस्तकाची सर्वात अश्वथामाच्या दूर निर्जन जंगलातील निवेदनाने सुरवात होते... मग अश्वत्थामा तुम्हाला महाभारतातील त्याचा जिथे जिथे सहभाग होता त्या घटनांमध्ये फिरवून आणतो. प्रत्येक घटनेत अश्वत्थामा त्याला अधर्माच्या बाजूला उभे राहिल्याचे बोचरे दुःख सांगत राहतो. अखेरीस पाचही पांडव पुत्र आणि उर्वशीच्या गर्भातील भ्रूणहत्येचे पाप केल्याचे मान्य करतो आणि श्रीकृष्णाने दिलेली शिक्षा स्वीकारतो.
उपसंहारात अश्वत्थामा त्याच्या करुण कहाणीतून मानवाने काय शिकले पाहिजे हे सांगतो.

No comments:
Post a Comment