Wednesday, February 11, 2026

#५७ पर्व - डॉ एस एम भैरप्पा

#marathibookreview #४/२०२६

ख्यातनाम लेखक डॉ एस एल भैरप्पा यांची गाजलेली कादंबरी "पर्व" !! महाभारतावरची वेगळ्या नजरेतून लिहिलेली ही तब्बल ७७६ पानांची कादंबरी अनुवादित केली डॉ सौ उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांनी. 

भैरप्पांनी ही कादंबरी शल्य राजाने दुर्योधन आणि धर्मराजा यातील कोणाची बाजू घ्यायची या प्रवेशाने सुरवात केली. आणि मग भीषण महाभारत युद्धाच्या अनेक घटनांमधून भीष्म, कर्ण, द्रोण, कृष्ण, भीम, कुंती, पांचाली, दुःशासन, बातमीदार संजय 😃, बलराम आणि सुभद्रा, अर्जुन अशा अनेक पात्रांच्या मनोगतातून ही ललित कादंबरी साकारली आहे. माणसांचे आणि त्यांच्या विचारांचे वेगवेगळे पैलू या कादंबरीत अनुभवायला मिळतात त्यात खूप मजा येते.

पण अगदी खरे सांगायचे तर मला ही कादंबरी काका विधातेंच्या "दुर्योधन" या कादंबरीपुढे फिकी वाटली. कदाचित अपेक्षा जास्त असेल किंव्हा अनुवाद करताना अवघड असेल. लेखकाने पुस्तकात अनेक वेळा युद्धमैदनातील हागण्या मुतण्याच्या दुर्गंधीमुळे होणारा पात्रांना त्रास, तसेच धृतराष्ट्राच्या शी शु प्रकरणे जास्तच चघळली आहेत असे वाटते. आणि अनेक वेळा जांभई आली, भूक लागली, झोप लागली हे प्रकार का घुसडले आहेत ते समजले नाहीत. म्हणजे त्यातून खरंच काही अर्थ उमजत नाही.

असो, ही गाजलेली कादंबरी वाचण्याच्या वेगळाच आनंद होता.

No comments:

Post a Comment