#marathibookreview
"या सम हा" हे मे जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी लिहिलेले थोरल्या बाजीरावांचे सुंदर पुस्तक वाचले. बाजीराव पेशव्याच्या २० वर्षांच्या अनेक युद्धांमध्ये वापरलेल्या युद्धतत्वांचा सखोल अभ्यास या पुस्तकात मांडला आहे. अठराव्या शतकातील दक्षिणेत निजामाला, वसई - गोव्यात पोर्तुगीज - इंग्रजांना आणि उत्तरेत बादशहाला हैराण करणाऱ्या मराठा सैन्याचा रोचक इतिहास वाचायला खास मजा आली. उद्दिष्टांची निवड, गतीक्षमता, बळाचे विकेंद्रीकरण, युद्धव्यवस्थापन, सुरक्षितता, सरप्राइज एलिमेंट अशा अनेक युद्धशास्त्रांचा बाजीरावाने लिलया वापर केला त्याकाळी. बाजीरावाने मराठ्यांचे स्वराज्य साम्राज्यात निर्माण केलेच, पण मराठ्यांच्यात अजिंक्यत्वाची भावना निर्माण केली हे पुस्तक वाचून नक्कीच समजेल. लेखकाने बाजीरावांच्या उणिवांवर देखील बोट ठेवले आहे, जसे की सैन्य सुधारणेवर फारसे कधी लक्षच दिले नाही. शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी आरमार बांधले होते, ज्याचा उपयोग बाजीरावाने खणखणीत विजय मिळवायला करायला हवा होता खरं तर. शिवाजी महाराज सेनापती बाजीरावाच्या साथीत अजून वीस वर्षे छत्रपती राहिले असते, तर कदाचित इतिहास खूप वेगळा असता, असे मला वाटते. बाजीरावाने शिवाजी महाराजांच्या वेढा टाकण्याच्या गनिमी काव्याचा सुरेख वापर केल्याचे पालखेड आणि भोपाळच्या युद्धावर्णनात वाचायला मिळाले.
पुस्तकात काही मजेशीर माहित्या देखील सापडल्या. उदा - मुंबई ही पोर्तुगीजांनी ब्रिटनच्या किंग चार्ल्सला पोर्तुगीज राजकन्या कॅथरीनबरोबरच्या लग्नात हुंडा म्हणून भेट दिली होते 😸😸... ठाण्यात कारखान्यासाठी जागा निवडीच्या मागणीसाठी मराठ्यांतर्फे व्यंकट जोशींना बाजीरावाने पोर्तुगीज लष्करी अधिकारी कॅप्टन लुई बोटेल्होला भेटायला पाठवले होते, तर त्याने बाजीरावांना "तो निग्रो आहे" असे संबोधले होते! नंतर मार्च १७३७ मध्ये बाजीरावाने त्याला कुत्र्यासारखा ठाण्यातून पळवला😸💪.
३३४ पानांच्या या पुस्तकात लेखकाने २१ संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला आहे. जबरी पुस्तक आहे, नक्कीच वाचनीय!!

No comments:
Post a Comment